शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

झेडपीच्या कृषी विभागावरील गंडांतर थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:18 IST

सांगली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून गुणनियंत्रण व विशेष घटक योजनेचे अधिकार शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे गंडांतर थांबवा, अशी मागणी गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षांनी खासदार, आमदारांकडे केली.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण म्हणजे दक्षता समितीची बैठक गुरुवारी खासदार संजयकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या वसंतदादा सभागृहात ...

सांगली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून गुणनियंत्रण व विशेष घटक योजनेचे अधिकार शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे गंडांतर थांबवा, अशी मागणी गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षांनी खासदार, आमदारांकडे केली.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण म्हणजे दक्षता समितीची बैठक गुरुवारी खासदार संजयकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या वसंतदादा सभागृहात पार पडली. या बैठकीला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर आदी उपस्थित होते.जिल्हा परिषदेकडील कृषी विभागाकडून गुणनियंत्रणआणि विशेष घटक योजनांच्या अंमलबजावणीचे अधिकार राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे देण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत. विविध योजनांमध्ये शेतकºयांचा सहभाग कमी होत चालला असताना, ज्या ठिकाणी पदाधिकारी असतात, अशा संस्थांच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी चांगली होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचा हा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी मंत्री, खासदार, आमदारांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी यावेळी केली.वीज कंपनीकडून सेवेच्या बाबतीत नसलेली तत्परता वसुलीत दाखविली जाते आणि कृषी विभागाकडून अनुदानाच्या योजनांबद्दल गाफिलपणाचे दर्शन घडते, अशी टीका करीत दक्षता समितीच्या बैठकीत गुरुवारी जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांनी दोन्ही विभागांच्या कारभारावर संताप व्यक्त केला.पीक विमा योजनेसाठी शेतकºयांचा समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. जिल्ह्यामध्ये केवळ ३० टक्के शेतकºयांनी पीक विमा घेतलेला आहे. खरीप व रब्बी हंगामामध्ये २ टक्के विमा असल्यामुळे शेतकरी विमा भरतात; मात्र द्राक्ष आणि डाळिंबासाठी विमा हप्त्याची रक्कम मोठी असल्यामुळे तसेच शेतकºयांना कमी भरपाई मिळते. यामुळे शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नाही, असे स्पष्टीकरण अधिकाºयांनी दिले. यावर अधिकारी शेतकºयांमध्ये जागृती करण्यास कमी पडत असल्याचे सांगत खासदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. द्राक्ष विमा मिळण्यासाठी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्ते, पदाधिकाºयांकडून करण्यात आली.दुरुपयोग झाल्यास कारवाईशासनाच्या विविध विभागांकडे काही ठराविकच व्यक्ती माहिती अधिकाराचे अर्ज करून शासकीय कामांमध्ये अडथळा आणण्याचे काम करतात. एकच व्यक्ती अनेक अर्ज अनेक विभागांमध्ये करत असेल, तर अशी व्यक्ती अधिकाºयांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना सदाभाऊ खोत यांनी दिल्या.

टॅग्स :zpजिल्हा परिषद